रस्ता मंजूर नाही;पाटी का लावली? ग्रामस्थांचा सवाल
नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते
नंदूरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गांवक-यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले.या पाटीवर कामाचे ठेकेदार शितल बिल्डींग मटेरियल ॲन्ड कन्स्ट्रक्शन धडगांव असेही नमूद करण्यात आले आहे.कामाचे उद्घाटन होऊन १ वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम झालेच नाही.
रस्ता नसल्याने १० दिवसापूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकाचा बाम्बूच्या झोळीतून दवाखान्यात नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला.रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते.गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रूग्णांना बाम्बुलन्स च्या झोळीतून तब्बल १५ किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते.येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात आले. त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाकडून या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अभियंता केलापाणी येथे आल्यानंतर पाटी लावून उद्घाटन केलेला रस्ता मंजूर नसल्याचे सांगण्यात आले.गांवक-यांना हे ऐकून धक्काच बसला.रस्ता मंजूरच नव्हता,तर आमदार ,खासदार मंत्र्यांनी कसले उद्घाटन केले? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. रस्ता मंजूर नसतांना आमदार व खासदार यांनी पाटी लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गांवक-यांना उल्लू बनवल्याची चर्चा रंगू लागली आहे.रस्ताही झाला नाही व पूलही झाला नाही.त्यामुळे केलापाणी येथील ग्रामस्थांना जगण्यासाठी बिकट वाट पार करावी लागत आहे. रस्ता व पुलाचे कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments