Advertisement

बागलाण तालुक्यातील पुर्व आणि उत्तर भागातील आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत सामाविष्ट करा-बिरसा फायटर्स

मुख्यमंत्री व राजपाल आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ साहेब यांना निवेदन

बागलाण:-बागलाण तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासीबहुल ग्रामपंचायतींना पेसा अधिनियम 1996 अंतर्गत समाविष्ट करून बागलाण तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतींची नवीन पुनर्रचना करुन नवीन ग्रामपंचायतींचा पेसा कायद्यांतर्गत समावेश करणेबाबत असी मागणी बागलाण तालुका शाखा बिरसा फायटर्स मा श्री रमेश बैस ( राज्यपाल)राजभवन,वालकेश्वर रोड
मलवार हिल- मुंबई मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई मा.ना.श्री.विजयकुमार गावीत साहेब,  
मंत्री,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई मा.नरहरी झिरवाळ साहेब,माजी विधानसभा उपाध्यक्ष मंत्रालय मुंबई. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की,बागलाण तालुका हा आदिवासीबहुल तालुका असल्याने विधानसभेसाठी आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ म्हणून ठेवण्यात आलेला आहे. सन 1978 पासून तालुक्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी विधानसभेत आदिवासींच्या मुलभूत अधिकार व हक्कांसाठी निवडून दिला जात आहे.परंतु तालुक्यात पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीची रचना पाहता तालुक्याचा पश्चिम भाग वगळता अन्यत्र पेसा कायद्याचा लाभ आदिवासीबहुल भागात होताना दिसत नाही.बागलाण तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जंगले असुन आजुबाजूला व जंगलात आदिवासी समाजाच्या लोकवस्त्या ठिकठिकाणी दिसुन येतात. या भागातील बहुसंख्य ग्रामपंचायतींचा लोकसंख्येच्या आधारावर विचार केल्यास अनेक गावांत आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.असे असुनही बागलाण तालुक्यातील या पुर्व व उत्तर भागात राहणाऱ्या आदिवासींवर अन्याय झाल्यासारखे वाटते. एकाच तालुक्यातील आदिवासींमध्ये दुजाभाव केल्याचे चित्र दिसते.सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील अनेक गावांमध्ये आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण वाढलेले असुनही आजपर्यंत तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींना पेसा अधिनियम 1996 मधील आदिवासींचे हक्क व अधिकार यापासून आदिवासींना वंचित ठेवण्याचे षडयंत्र नेमके कोणाचे ?? असा प्रश्न निर्माण होतो. 
           म्हणून आम्ही आपणास विनंती करतो की बागलाण तालुक्यातील पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या व नवीन ग्रामपंचायतींचा खासकरून पुर्व व उत्तर भागातील ग्रामपंचायतींचा नव्याने लोकसंख्येच्या आधारावर सर्व्हे करुन तालुक्यातील पेसा पुनर्रचना करण्यात यावी व येथील आदिवासींना न्याय मिळवून देण्यात यावा.गेल्या 40 वर्षापासून बागलाण तालुक्यातील पुर्व व उत्तर भागातील आदिवासींवर अन्याय होत आहे.म्हणून आम्ही पुनश्च तुम्हाला विनंती करतो की आपण स्वत सदर विषयावर लक्ष घालून येथील आम्हा आदिवासींना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा असी मागणी बागलाण तालुका शाखा बिरसा फायटर्स यांनी केले 

Post a Comment

0 Comments