Advertisement

जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाकडपाडा येथे कार्यक्रम

पालगर : सौरभ कामडी 

धरती आबा, जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज वाकडपाडा येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी प्रदीप वाघ यांनी सांगितले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिवीर धरती आबा जननायक भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान चा नारा दिला होता तो आजही आपल्या द्यायचा आहे.आणि तेच खरं अभिवादन महापुरुषांच्या जयंती निमित्त ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी ग्रामपंचायत विकास आराखडा मंजूर करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन कले होते. यावेळी प्रदीप वाघ उपसभापती,सौ.लता वारे उधळे सरपंच, नरेंद्र येले करोळ सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच, परशुराम अगिवले उपसरपंच हनुमंत फसाळे उपसरपंच, ग्रामसेविका मंदा पारधी, रघुनाथ ठोमरे ग्रामसेवक, कामडी ग्रामसेवक,प्रशिक्षक श्रीमती सुवर्णा पाटील, कृषी सहायक एस.जे.मिटकरी, सर्व ग्रामपंचायती चे सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments