Advertisement

पावरा गुरुजी कडाडले, रामदास कदम रडले

*रामदास कदममुळे जी लोक रोज रडतात त्यांच काय?*

*जैसी करणी वैसी भरणी!*

*रामदास कदम यांनी अनेक निरपराध लोकांना अडकवले: सुशिलकुमार पावरा*

रत्नागिरी: रामदास कदम यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम हे फक्त एक मिनीट रडल्याचे टिव्हीवर दाखवण्यात आले.मात्र ज्या रामदास कदममुळे जी लोक रोज रडतात, 300 वेळा रडतात, 300 वेळा उपोषण करतात, त्या लोकांनाही टिव्हीवर दाखवा.म्हणजे रामदास कदम यांचे खरे रूप जनतेला दिसेल.रामदास कदम हा ढोंगी व पापी माणूस आहे.300 वेळा उपोषण करणा-या एका निरपराध आदिवासी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांना षडयंत्र रचून बनावट व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे महापाप केले.या पापाचे फळ रामदास कदम आज भोगत आहेत. जैसी करणी वैसी भरणी!एका निरपराध गुरूजीला अटकवताना तुम्हाला मजा येत होती,हसू येत होतं,आता कसं काय रडू येतयं?आता का असे रडतायं?
                      त्या गुरूजींनी तुमचे काय बिघडवलं होतं?ऐवढे मोठे षडयंत्र तुम्ही रचलं? सत्ता व मंत्रीपद हातात आलं म्हणून काहीही करायचं का? वाट्टेल ते करायचं का?याला अडकव त्याला अडकव, याचे आयुष्य उद्ध्वस्त करं त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करं ,हेच धंदे रामदास कदम यांनी आजवर केले.त्या गुरुजींना काय हवं होतं,फक्त त्यांची रोजी रोटी, पगार ,ती मिळत नाही म्हणून त्यांनी विजय बाईत नावाच्या विस्तार अधिका-याची तक्रार केली आणि तुम्ही विजय बाईत सारख्या भ्रष्टाचारी,पैसे घेतांना सापडलेला अधिकारी टिव्हीवर दाखवण्यात आले,बोगस, दोषी प्रभारी गटशिक्षणाधिका-याला वाचविण्यासाठी एका निरपराध शिक्षकाला षडयंत्रात अटकलं.गुरुजींना लोक देव मानतात, परमेश्वर मानतात.त्याच परमेश्वराला अटकवायला,त्याच्याविरोधात षडयंत्र रचले.तुमच्या या कामाला परमेश्वर का म्हणून तुम्हाला माफ करेल?तुम्हाला वाईट कामांची सजा मिळणारच.ती आज मिळतेय,रडा आणखी रडा!
                 माझा कुठल्याही पक्षाला विरोध नाही.विरोध आहे तो रामदास कदम सारख्या निच माणसाचा,दृष्ट माणसाचा,वाईट कामे करणा-या माणसाचा!रामदास कदम यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,शिवसेना पक्षातून हकालपट्टी या मागणीसाठी मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसलो होतो. ती माझी मागणी आज पूर्ण झाली.मी परमेश्वराचे धन्यवाद मानतो की, परमेश्वराने माझी मागणी उशीराने ऐकली.उद्धव ठाकरे यांचेही आभार मानतो की,रामदास कदम सारख्या वाईट माणसाची पक्षातून हकालपट्टी केली,एक चांगले काम केले.
                    रामदास कदम यांना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेतेपद देण्यात आलं म्हणून रामदास कदमांना आनंद झाला असेल. पण त्यांचा आनंद हा दिर्घ काळ टिकणार नाही.अनेक निरपराध लोकांना अटकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे महापाप रामदास कदम यांनी केले.त्या पापांचा घडा भरून आता फूटत आहे.माझ्यासारखी प्रकरणे समोर येत आहेत. अनेक निरपराध लोकांची प्रकरणे समोर आल्यानंतर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या गटात ठेवणार नाहीत. त्यांना लवकरच आपल्या गटातून हाकलतील. कारण रामदास कदम हा एक खराब आंबा आहे,तो टोपलीत ठेवला की सगळी आंबे खराब होतील. रामदास कदम मुळे शिंदे गट खराब होईल,शिंदे गटाची वाट लागेल म्हणून एकनाथ शिंदे यांनी या खराब आंब्याला आपल्या टोपलीतून काढून फेकावे, अशीही आमची मागणी आहे.रामदास कदम यांना शिंदे गटात काय नरकात सुद्धा जागा मिळणार नको,ही माझी परमेश्वराला प्रार्थना आहे. अशा शब्दांत शिक्षक सुशिलकुमार पावरा हे रामदास कदम यांच्यावर कडाडले आहेत.

Post a Comment

0 Comments