Advertisement

रामदास कदमांना शिवसैनिकांच्या आधी आदिवासी लोक जोड्याने मारतील: सुशिलकुमार पावरा

*रामदास कदम हा राजकारणातला व्हिलन: सुशिलकुमार पावरा*

दापोली:रामदास कदम हा कुसंस्कारी माणूस आहे,कुणाबद्दल काय बोलायचे याचे भाषीय संस्कार कदमांना नाहीत. माझ्यासारख्या 350 वेळा उपोषण करणा-या निरपराध आदिवासी शिक्षकाला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप केले आहे.आदिवासी शिक्षकांना बोगस व दोषी अधिकाऱ्यांमार्फत त्रास देण्याचे काम केले आहे,त्यामुळे रामदास कदम यांच्या विरोधात प्रचंड संताप आमच्यासारख्या आदिवासींमध्ये आहे,म्हणून रामदास कदमांच्या विरोधात शिवसैनिकांचा उद्रेक झाला असला तरी शिवसैनिकांच्या अगोदर आम्ही आदिवासी लोकच रामदास कदम यांना जोड्याने मारू,असा इशारा शिक्षक तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिला आहे.
                     रामदास कदम राजकारणातला व्हिलन आहे. या व्हिलनचा अंत कधी होतो,याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय.रामदास कदम यांच बोलणं,चालणं,राहणं सुद्धा व्हिलन सारखाचं आहे.यांच्या तोंडातून नेहमी शिव्या,धमक्या,अर्वाच्च शब्दच बाहेर पडतात,तोंडातून कायम घाणच निघते.अशा माणसाकडून चांगल्याची अपेक्षा जनतेने ठेवू नयेत. 
             यांच्यासमोर गुरूजी काय? आई काय? बाप काय? बहिण काय?लहान काय?मोठे काय?या माणसाजवळ बोलण्याची व वागण्याची वैचारिक व राजकीय सभ्यता नाही.
            ज्या पद्धतीने दापोली येथील सभेत शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे,आदित्य ठाकरे,सौ.रश्मी ठाकरे यांच्याबद्दल सगळ्या मर्यादा ओलांडून रामदास कदम बोलले,त्यावरून रामदास कदम यांची लायकी जनतेला समजली.रामदास कदमचे खरे रूप जनतेसमोर यायला लागले.उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी अगदी खालच्या पातळीवर येऊन जहरीली टिका केली,आक्षेपार्ह वक्तव्य केलं, यावरून रामदास कदम हा किती निच व वाईट माणूस हे जनतेने पाहिले.
             आजपर्यंत रामदास कदम यांनी गुंडगिरीने शिक्षकांना,कर्मचाऱ्यांना,अधिका-यांना,पोलिसांना व न्यायाधिशांना सुद्धा आपल्या सत्तेचा व पदाचा दुरूपयोग करत मनमानी केलेली आहे,त्रास दिलेला आहे.पदाचा व सत्तेचा माज या माणसाला होता.
               परंतु रामदास कदमची भाईगिरी,गुंडगिरी,दादागिरी ,डाकुगिरी आता आमच्यासारखे अन्यायग्रस्त कधीच खपवून घेणार नाहीत. यांच्या वाईट कर्माची फळे यांना मिळतीलच. रामदास कदमचा राजकीय अंत झालाच पाहिजे.यांचा पापाचा गळा भरलेलाच आहे.हा कधी फुटतोय,त्याचा अंत कधी होतोय?याची जनता व आमच्यासारखे अन्यायग्रस्त वाटच बघत आहोत,अशी प्रतिक्रिया शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments