Advertisement

आदिवासींची स्वतंत्र गणना व्हावी,बिरसा फायटर्सची मागणी

*नव्या राष्ट्रपतीला बिरसा फायटर्सचे साकडे*

*स्वातंत्र्यापूर्वी आदिवासींची गणना आदिवासी म्हणून होत होती* 

*आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व व ओळख आहे*

*आदिवासींना हिंदू,मुस्लिम व ख्रिश्चन,बौद्ध बनविण्यात आले: सुशिलकुमार पावरा*

रत्नागिरी: आदिवासींना स्वतंत्र धर्म कोड मिळावा,आदिवासींची स्वतंत्र गणना करण्यात यावी,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स,सुरेशकुमार पंंधरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव,दादाजी बागुल महानिरीक्षक व कोषाध्यक्ष, संजय दळवी सचिव,भरत पावरा जिल्हाध्यक्ष नंदुरबार, गणेश खर्डे कार्याध्यक्ष नंदूरबार ,जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदूरबार,अंकुश साबळे जिल्हाध्यक्ष परभणी,विजय सहारे कार्याध्यक्ष नाशिक, आकाश पवार तालुका अध्यक्ष बागलाण,सतीश जाधव जिल्हाध्यक्ष ठाणे,ज्ञानेश्वर मोरे उपाध्यक्ष मालेगाव, सचिन सोनवणे उपाध्यक्ष मालेगाव, राजू जाधव कार्याध्यक्ष बागलाण , उमाकांत कापडणीस जिल्हाध्यक्ष नाशिक,विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष धुळे यांनी भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मृर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी हे हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन किंवा अन्य धर्माचे नाहीत. आदिवासी हे निसर्गपूजक आहेत.वाघदेव, बापदेव,डोंग-यादेव,वृक्ष, प्राणी,जल ,जंगल, जमीन इत्यादी निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा करत होते व ते आजही निसर्गाची पूजा करतात. आदिवासींची संस्कृती ही स्वतंत्र व विशिष्ट आहे. आदिवासींची संस्कृती कुठल्याही धर्माची मिळतीजुळती नाही.आदिवासींच्या रूढी,परंपरा,रितीरिवाज,भाषा,पोशाख, जीवनशैली इत्यादी स्वतंत्र आहेत. आदिवासींचे स्वतंत्र अस्तित्व आहे,एक वेगळी ओळख आहे.इंग्रजांच्या काळात भारतीय जनगणनेत आदिवासींसाठी ओबाजिनीज, अँनामिस्ट ,ट्रायबल म्हणून ओळखल जात होतं.स्वातंत्र्यानंतर भारतीय जनगणनेत आदिवासींचं अस्तित्व दाबण्यात आलं.आदिवासींना विविध धर्मात गुतवण्यात आलं,काहींना धर्मांतरीत करण्यात आलं.सध्याची प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय प्रवृत्तीची लोक आदिवासींना हिंदू ठरवू पाहत आहेत.मात्र आम्ही आदिवासी हिंदू नाहीत. आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत.
                     मा.सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा "आदिवासी हे हिंदू नाहीत" असा निर्णय दिला आहे.त्यामुळे आमच्या आदिवासींकरिता स्वतंत्र धर्म कोड जाहीर करावा.सन 2022 मध्ये होणा-या जनगणनेत आदिवासींचा स्वतंत्र धर्म कोड काॅलम 7 जाहीर करण्यात यावा.काही राजकीय स्वार्थी विचारसरणीची लोक आदिवासींना जबरदस्तीने हिंदू बनवत आहेत. वनवासी म्हणून उल्लेख करत आहेत. आदिवासी हे वनवासी नाहीत, तर मूलनिवासी आहेत. या देशाचा खरा मालक आदिवासी आहे.या धरतीचा खरा पुत्र आदिवासी आहे.तरीही काही विचार सरणीची लोक आदिवासींना हिंदू,मुस्लिम व ख्रिश्चन बनवत आदिवासींचे अस्तित्व संपविण्यासाठी कटकारस्थान करीत आहेत. हे कटकारस्थान रोखण्यासाठी आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी धर्म काॅलम 7 जाहीर करावा.अन्यथा नाईलाजाने संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments