Advertisement

भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिरपूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.


ज्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात प्रौढ मतदानाची वयोमर्यादा 18 वर्षे, डिजिटल क्रांतीचा पाया, पंचायतीराज धोरण, जवाहर नवोदय विद्यालय योजनेची सुरुवात, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा आणि दूरसंचार क्रांती या घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे आजच्या भारताच्या विकासाची पायाभरणी झाली असे आधुनिक भारताचे शिल्पकार, विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या बलिदान दिनानिमित्त शिरपूर तालुका राष्ट्रीय काँग्रेस व युवक काँग्रेस तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित उत्तम माळी शिरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष, गेंद्या पावरा अध्यक्ष शिरपूर तालुका युवक काँग्रेस, अरुण भाऊ, विजय तिवारी, प्रेमकुमार चौधरी, सुभाष वाघ, साहेबराव पाटील, चंद्रकांत फुलारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

Post a Comment

0 Comments