Advertisement

सिल्ली/ तिरोडा येथे बिरसा फायटर्सच्या वतीने सुरू झालेल्या आदिवासी जनगणना विषयक माहितीपर चर्चा

विकास हा सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कॄतिक धार्मिकतेवर अवलबुन असावा तरच समता न्यायधिष्टीत समाजरचणा निर्माण होईल.:बिरसा फायटर्स 


एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी राष्ट्रीय विश्वगामी पञकार संघ 


तिरोडा ( २०) दिवाळीच्या शुभ पर्वावर जनगणना व्हावी हा सरकारचा चांगला संकेत असून आदिवासी संबंधित धर्मविषयक नविन शासकीय संरचनेत अजून कोणताही धर्म काँलम तयार नसून त्यात हिंदु,मुस्लीम,शिख,ईसाई जैन बुध्दीष्ट,व ईतर असे कालम आहेत. व जातीचे नावे समाविष्ठ आहेत.त्यामुळे संमभ्र दुर व्हावा हाच उद्देश समोर ठेवून  सभा आयोजित केली त्यात  शामरावजी उईके प्रदेश अध्यक्ष व प्रमुख ,राकेश सोयाम,महासचिव विदर्भ, राकेश कुभरे, सलिराम मरस्कोल्हे, सचिव ,सिल्ली ग्राम बिरसा फायटर्स चे सदस्य हजर होते यावेळी विकासाचे केंद्र बिंदुवर चर्चा करून धर्म व्यतिरिक्त कालम व आदिवासीची  विकासा सह सास्कॄतिक समाज रचणा स्पष्ट करण्यात आली व बेरोजगार व सुशिक्षितांना काम धंदा कसा मिळेल व समाजप्रवाहात समाज पुढे कसा आनता येईल यावर चर्चा झाली व भगवान बिरसा मुंडा १५ नोव्हंबर जयंतीवर स्थानिक स्तरावर जन्मदिन सन साजरा करावा असा आवाहन एस जी उईके प्रांताध्यांयक्ष नी सांगितले. *धर्मकोड* हा विषय आदिवासी शब्द संस्कॄतीशी जोडून निगडीत असल्याने आदिवासी शब्द प्रयोग करा असा निर्णय झाला.

Post a Comment

0 Comments