एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी
सर्वोच्य न्यायालयाच्या जगदिश बहिरा निकालानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यात काय पावले उचलल्या गेली, जात पडताळणी कायदयाच्या तरतूदींची शासन जमातीचे दावे अवैध ठरलेल्या कर्मचा-यांवर कशी अंमलबजावणी करीत आहे, अधिसंख्य पदांच्या अनुशंगाने भूजबळ समितीचा अहवाल, अनुसूचित जमातीची रिक्त पदे, 21 डिसेंबर 2019 च्या शासन निर्णयानंतर अनुसूचित जमातीची भरलेली पदे, न्यायालयीन प्रकरणे इ. मुदयावर मुख्य सचिवांची आयोगाने झाडाझडती घेतली. त्यात सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सूमित भांगे यांनी कोविडच्या कारणाने पदभरती करता आली नाही, असे आयोगापुढे सांगितले तर अधिसंख्य कर्मचा-यांना वाढीव महागाई पेंशन व इतर कोणतेही आर्थिक लाभ त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर देय नाहीत, अशी साक्ष आयोगापुढे दिली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी शासनाच्या विविध विभागात गैरआदिवासींनी बळकावलेली अनुसूचित जमातीची एकुण 3 हजार 898 पदे रिक्त केली असल्याची माहिती दिली. थेट नियुक्तीने शासनाच्या वतीन फक्त 123 पदे भरलयाची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे सचिव भांगे यांनी त्यांच्या शपथपत्रात दिली. षासनाने 12 एप्रील 2022 ला पदभरतीवरील बंदी उठवली असून वर्ग-1व2 ची 100 टक्के पदभरती होणार आहे व वर्ग 3 व 4 साठी 50 टक्के जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग-1 व 2 ची 8455 पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्याची विनंती केली असून त्यात अनुसूचित जमातीची किमान 550 पदे असल्याची माहिती दिली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी शासकीय सेवेत सध्यास्थितीत अनुसूचित जमातीची 1 लाख 55 हजार 696 राखीव पदे असून त्यापैकी 1 लाख 9 पदे भरली असून अद्याप शासनाच्या विविध विभात अनुसूचित जमातीची 55 हजार 687 पदे रिक्त असल्याची माहिती आयोगापुढे सादर केलेल्या षपथपत्रात दिली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे मुख्यमंत्री व वित्त विभागाची मंजूरी घेउन लवकरच अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरती केली जाईल अषी माहिती राष्ट्रीय जनजाती आयोगापुढे दिली आहे. आयोगाच्या अनुपालनासाठी सामान्य प्रशासन विभागाने नुकताच शासनाच्या विविध विभागांना अनुसूचित जमातीच्या नियुक्तीची व रिक्त पदांची माहिती तातडीने मागितली आहे. राजेंद्र मरसकोल्हे व जनजाती आयोगाच्या पुढाकाराने महाराष्ट्रात अनुसूचित जमातीच्या पदभरतीची रखडलेली प्रक्रिया गतिमान होण्याची चिन्हे आहेत.
नागपूर
दिनांक: १३ ऑगस्ट २०२२
0 Comments